Manish Jadhav
उन्हाळ्यात भारतातील नयनरम्य डोंगराळ ठिकाणांपेक्षा दुसरे काहीही चांगले असू शकत नाही. भारतातील डोंगराळ ठिकाणांचे शांत आणि थंड हवामान शहरी जीवनातील उष्णता आणि प्रदूषणापासून आराम देते.
अलीकडच्या काळात प्रदूषण वाढल्यामुळे लोक अशा ठिकाणांची निवड करत आहेत जिथे ताजी हवा घेण्यासाठी हवेची गुणवत्ता चांगली असेल. देशातील डोंगराळ ठिकाणे बेस्ट डेस्टिनेशन्स आहेत.
जर तुम्ही शुद्ध हवेसह ताजेतवाने करणारी उन्हाळी सुट्टी नयनरम्य डोंगराळ ठिकाणी घालवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या 5 बेस्ट डेस्टिनेशनला नक्की भेट दिली पाहिजे.
कर्नाटकच्या हिरव्यागार पश्चिम घाटाच्या मध्यभागी वसलेले मडिकेरी चित्तथरारक दृश्ये, धबधबे, कॉफीचे मळे आणि समृद्ध इतिहासासह उन्हाळी सहलीसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी असलेले ऋषिकेश योग, ध्यान आणि आध्यात्मिक विश्रांतीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
पहलगाम हे असे स्वप्नभूमी आहे जिथे तुम्हाला आयुष्यात एकदा तरी भेट द्यायची इच्छा होईल.
उटी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते, पण कुन्नूरबद्दल लोकांना फारशी माहिती नाही, जिथे त्यांना ताजी हवा आणि कमी गर्दी मिळते.
हिरवीगार डोंगर, धुंद सकाळ, चहाचे अमर्याद मळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ हवा यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. हे सगळं तुम्हाला मुन्नारमध्ये पाहयला मिळते.