मराठ्यांच्या भीतीने ब्रिटिशांनीच तोडला... 400 वर्षांहून जुना 'वांद्रे किल्ला' बनला बॉलीवूडचं आवडतं शूटिंग स्पॉट

Manish Jadhav

वांद्रे किल्ला

वांद्रे किल्ला मुंबईतील वांद्रे परिसरात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दाखवणारा हा किल्ला महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.

Bandra Fort | Dainik Gomantak

पोर्तुगीजांनी बांधला

हा किल्ला सुमारे 1640 मध्ये पोर्तुगीज लोकांनी बांधला होता. त्यांना अरबी समुद्रातून येणाऱ्या शत्रूंपासून बचाव करायचा होता, म्हणून त्यांनी हे ठिकाण निवडले.

Bandra Fort | Dainik Gomantak

समुद्रावर नजर

या किल्ल्यावरुन माहीमची खाडी आणि अरबी समुद्रावर सहज लक्ष ठेवता येत होते. शत्रू जहाजे समुद्रातून येतात का, हे पाहण्यासाठी हे ठिकाण खूप महत्त्वाचे होते.

Bandra Fort | Dainik Gomantak

ब्रिटिशांनी तोडला

1739 मध्ये मराठा सैन्य या किल्ल्यावर हल्ला करेल, या भीतीने ब्रिटिश सैन्याने स्वतःच या किल्ल्याचा काही भाग तोडून टाकला होता, जेणेकरुन मराठ्यांना त्याचा फायदा मिळू नये.

Bandra Fort | Dainik Gomantak

सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध

आज हा किल्ला मुंबईतील उत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथून तुम्ही समुद्राचे, वांद्रे-वरळी सी-लिंकचे आणि सूर्यास्ताचे खूप सुंदर दृश्य पाहू शकता.

Bandra Fort | Dainik Gomantak

बॉलीवूडचे आकर्षण

वांद्रे किल्ला अनेक वर्षांपासून बॉलीवूडचे आवडते शूटिंग स्पॉट राहिले आहे. 'दिल चाहता है' आणि 'जाने तू या जाने ना' यांसारख्या चित्रपटांतील काही दृश्ये येथे चित्रित झाली आहेत.

Bandra Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची दुरुस्ती

2003 मध्ये मुंबईतील काही संस्थांनी पुढाकार घेऊन या किल्ल्याची दुरुस्ती (Restoration) केली, ज्यामुळे आज आपण त्याला चांगल्या स्थितीत पाहू शकतो.

Bandra Fort | Dainik Gomantak

पर्यटनाचे खास केंद्र

हा किल्ला म्हणजे मुंबईच्या इतिहासाचा आणि स्थापत्यकलेचा एक महत्त्वाचा भाग आहे. शांत आणि सुंदर वातावरणामुळे अनेक लोक इथे फिरायला येतात.

Bandra Fort | Dainik Gomantak

Kuldeep Yadav: कुलदीप यादवचा धमाका, घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा ठरला तिसरा डावखुरा गोलंदाज!

आणखी बघा