Akshata Chhatre
भारतामध्ये फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा प्राचीन काळापासून लोकांना भुरळ घालत आला आहे. बाबरच्या भारतात येण्यामागेही आंब्याचा एक मोठा भाग होता.
पंजाबचे तत्कालीन राज्यपाल दौलत खान लोदी आणि मेवाडचे राणा सांगा यांनी इब्राहिम लोदीविरुद्ध मदतीसाठी बाबरला आमंत्रित करताना त्याला आंबेही पाठवले होते.
या चवीला मोहून बाबरने केवळ भारतात येण्याचाच नाही तर येथे मुघल साम्राज्य स्थापण्याचाही निर्णय घेतला.
पहिल्या पानिपतच्या लढाईनंतर त्याने भारतातून समरकंदपर्यंत आंबे पाठवण्यासाठी खास दूत व्यवस्था तयार केली.
अकबरने बिहारमधील दरभंगाजवळ लाखो आंब्याची झाडे लावून "लक्खी बाग" निर्माण केली, तर जहांगीरने लाहोरमध्ये आंब्यांचे बाग तयार केले.
शाहजहाननेची आंब्यावरील आसक्ती इतकी होती की, त्याने आपल्या मुलाला आणि दख्खनचे वजीर असलेल्या औरंगजेबला कमी व निकृष्ट आंबे पाठवल्यामुळे नजरकैदेत ठेवले होते.
इतकंच नव्हे, तर सिंहासनासाठी मदत मिळवण्यासाठी औरंगजेबाने फारसच्या शाह अब्बासला आंब्यांचीच भेट दिली होती.