Akshata Chhatre
सध्या सोशल मीडियावर एक खास पेय मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्याला अनेकजण “डिटॉक्स” किंवा “कॅन्सर फायटिंग शॉट” म्हणतात.
हळद, आले, लसूण, आवळा यांसारख्या घरगुती घटकांपासून बनवलेले हे पेय शरीराला गंभीर आजारांपासून वाचवते असा समज मोठ्या प्रमाणावर पसरला आहे
मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते या दाव्यांमध्ये पूर्ण सत्यता नाही. हे पेय निश्चितच आरोग्यदायी असले तरी ते गंभीर आजारांवर रामबाण उपाय ठरू शकत नाही.
कर्करोगासारखे गंभीर आजार बरे करण्यासाठी केवळ शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन किंवा लक्ष्यित थेरपीसारख्या प्रमाणित वैद्यकीय उपचारांचीच आवश्यकता असते.
कोणतेही घरगुती पेय थेट कर्करोगावर उपाय करू शकत नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही की हे घटक पूर्णपणे निरुपयोगी आहेत.
हळद, आले, काळी मिरी आणि आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्म असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
हे घटक शरीराला संसर्गांपासून लढण्याची ताकद देतात. तसेच, त्यांच्या नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते, रक्त शुद्ध होते आणि शरीरातील ऊर्जा वाढते.