दैनिक गोमन्तक डिजिटल
सर्वात महत्त्वाची तयारी.वारीमध्ये शेकडो किलोमीटर पायी चालावे लागते. त्यामुळे नवीन चपला किंवा बूट वापरणे टाळा. आधीच वापरलेले, मऊ आणि आरामदायी चपला किंवा सँडल वापरा, जेणेकरून पायाला फोड (Blisters) येणार नाहीत.
हायड्रेशन अत्यंत गरजेचे.सतत चालल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे सोबत स्वतःची पाण्याची बाटली ठेवा. वाटेत कुठेही उघड्यावरचे पाणी न पिता, शुद्ध किंवा उकळलेले पाणी प्या. ग्लुकोज किंवा ORS चे पाकीट सोबत ठेवणे फायदेशीर ठरेल.
पावसाळ्यापासून संरक्षण.आषाढी वारी दरम्यान बऱ्याचदा मुसळधार पाऊस असतो. पावसात भिजल्यामुळे सर्दी, खोकला किंवा ताप येऊ शकतो. त्यामुळे वजनाने हलका असलेला रेनकोट किंवा छत्री आपल्या सॅकमध्ये (Bag) नेहमी वरच्या बाजूला ठेवा.
आरोग्याची सुरक्षा.जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) किंवा रक्तदाबाचा (BP) त्रास असेल, तर तुमची नियमित औषधे पुरेशा प्रमाणात सोबत ठेवा. याशिवाय ताप, अंगदुखी, जुलाब यांवरील गोळ्या आणि ओआरएस, बँड-एड, पेन रिलिफ स्प्रे (Pain Spray) जवळ बाळगा.
आहाराची काळजी. वारीच्या वाटेवर अनेक ठिकाणी अन्नदान केले जाते. मात्र, अतिशय तेलकट, तिखट किंवा उघड्यावरील अन्न खाणे टाळा. पचनास हलका असलेला आणि ताजा आहार घ्या, जेणेकरून पोट बिघडणार नाही. सोबत सुकामेवा किंवा बिस्किटे ठेवू शकता.
वैयक्तिक स्वच्छता. लाखोंच्या गर्दीत संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका जास्त असतो. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. तसेच वैयक्तिक स्वच्छतेसाठी ओले वाईप्स आणि ओआरएस सोबत ठेवल्यास प्रवासात सोयीचे होते.
कपड्यांचे नियोजन.चालताना अंगात घट्ट कपडे घालणे टाळा. सुती आणि सैल कपड्यांमुळे घाम शोषला जातो आणि चालणे सोपे होते. सोबत २ ते ३ अतिरिक्त कपड्यांचे जोड ठेवा आणि ते ओले होणार नाहीत अशा प्लास्टिक पिशवीत पॅक करून बॅगेत ठेवा.
ओळख पटवण्यासाठी.गर्दीत अनेकदा मोबाईल नेटवर्क मिळत नाही किंवा फोन हरवण्याची शक्यता असते. म्हणूनच स्वतःचे आधार कार्ड, पत्ता आणि घरातील व्यक्तींचे फोन नंबर लिहिलेली एक चिठ्ठी किंवा ओळखपत्र नेहमी खिशात किंवा गळ्यात ठेवा.