Sameer Amunekar
पावसाळ्यात आंबोली घाट धुक्याच्या चादरीने झाकला जातो. चारही बाजूंना दिसणारी दाट हिरवाई मन मोहून टाकते.
पावसाळ्यात घाटातील असंख्य छोटे-मोठे धबधबे जिवंत होतात. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि निसर्गरम्य दृश्यं अनुभवण्यासारखी असतात.
आंबोलीचा नागमोडी घाटरस्ता प्रवासात रोमांच वाढवतो. वाटेत मिळणारे हिरवेगार डोंगर आणि धुक्यात हरवलेले रस्ते खास आकर्षण ठरतात.
हिरण्यकेशी परिसरातील शांत वातावरण आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात या परिसराचं रूप आणखी खुलतं.
फोटोग्राफी आणि निसर्गाचा आनंद घेणाऱ्यांसाठी आंबोली म्हणजे पर्वणीच! धुकं, डोंगर, धबधबे आणि हिरवाई प्रत्येक क्षण खास बनवतात.
पावसाळ्यात आंबोलीचं वातावरण आल्हाददायक आणि थंडगार असतं. शहराच्या गोंगाटापासून दूर काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
मित्र, कुटुंब किंवा जोडीदारासोबत छोट्या ट्रिपचा प्लॅन असेल, तर आंबोली घाट नक्कीच यादीत ठेवा. निसर्गाचा थरार आणि पावसाळ्याची मजा इथे एकाच ठिकाणी अनुभवता येते.